भारताचे संविधान
बोधकथा
हिंदी सुविचार
वंदे मातरमव देशभक्तीपर गीत
Marathi Suvichar and Marathi Thoughts : फक्त मराठी भाषेमध्ये
शालेय परिपाठ
=====●●●★●●●=====
🔳 दिनांक :- 23/04/2016 🔳
🔘🔘 वार - शनिवार 🔘🔘
■★■★■★■★■★■★■★
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०१) 🔶🔹आजचे पंचाग🔹
🍥 23. एप्रिल :: शनिवार 🍥
★■★■★■★■★■★■★
चैञ कृ. १
तिथी : कृष्ण पक्ष प्रतिपदा, नक्षत्र : स्वाति,
योग : सिद्धि, करण : कौलव,
सूर्योदय : 06:15, सूर्यास्त : 18:58,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०२) 🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
23. जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०३) ▪🔸 म्हणी व अर्थ
23. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही –
⭐अर्थ :: ~
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०४) ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
23. सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।
अर्थ : सर्व सत्यावर आधारलेले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०५) ▪🔹 दिनविशेष
★ 23. एप्रिल :: शनिवार ★
=====●●●★●●●=====
* जागतिक पुस्तक दिन
* हा या लीप वर्षातील ११४ वा दिवस आहे.
$ महत्त्वाच्या घटना $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९९० : नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
१८१८ : दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.
$जन्मदिवस / जयंती / वाढदिवस$
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९३८ : एस. जानकी – शास्त्रीय गायिका
१८७३ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक
(मृत्यू: २ जानेवारी १९४४)
१८५८ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
१८५८ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
१५६४ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
(मृत्यू: २३ एप्रिल १६१६)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२०१३ : शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९)
२००७ : बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष
(जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
२००१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक
(जन्म: १२ आक्टोबर १९२१)
२००० : मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन
१६१६ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
(जन्म: २३ एप्रिल १५६४)
========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०६) ▫▪ बोधकथा ▪
23. 🌹सदाचरण आणि नैतिकता🌹
=====●●●★●●●=====
एकदा अकबर आणि बिरबल यांच्यात बोलणे चालू होते. बोलता बोलता बिरबल म्हणून गेला,"बादशहा! आपण जसे एकमेकांशी बोलतो तसेच आपले आत्मे एकमेकांशी बोलतात." हे ऐकून अकबर लगेच म्हणाला,"असे बोलणे तुला शोभत नाही, एकतर हे सिद्ध कर नाही तर शिक्षेला तयार हो." बिरबलाने आपले बोलणे सिद्ध करून दाखविण्याची तयारी केली. बिरबल व अकबर लगेचच वेषांतर करून ग्रामीण पोशाखात बाहेर पडले. बिरबल मालक तर अकबर बादशहा त्याचा नोकर झाला होता. काही अंतर गेल्यावर त्यांना एक जंगल लागले, समोरच एक लाकुडतोड्या झाडे तोडत होता. त्याला पाहताच बिरबलाने अकबराला विचारले,"हुजूर! या लाकुडतोड्याबद्दल आपले काय मत आहे?" बादशहा म्हणाला, "अरे याला आताच्या आता मारून टाकावेसे वाटत आहे. तुला दिसत नाही का तो फळा फुलांनी बहरलेले हिरवेगार झाड तोडत आहे ते?" बिरबलाने म्हंटले,"आपण त्याच्याजवळ जाऊ" ते त्याच्याजवळ गेले आणि बिरबल लाकूडतोड्याला म्हणाला,"भाऊ! तू हे हिरवेगार झाड का तोडत आहे?" लाकुडतोड्या म्हणाला,"मित्रा ! अरे माझे उदरनिर्वाहासाठी हि झाडे लागतात.राजधानीकडून आलेले दिसताय काय नवीन बातमी?" बिरबल म्हणतो,"अरे अकबर बादशहा या जगात राहिले नाहीत" लाकुडतोड्या म्हणतो," बरे झाले गेला तो अकबर ! बदमाश होता !" या उत्तराने अकबर हैराण झाला पण त्याने नोकराचा वेश घेतल्या कारणाने त्याला काही बोलता येईना. बिरबलाने त्याला पुढे चालण्यास सांगितले. दोघे पुढे गेले तर काही अंतराने एक वृद्ध महिला बकऱ्या चारताना दिसली, बिरबलाने परत अकबराला विचारले,"या महिलेबद्दल तुमचे मत काय?" अकबर म्हणाला,"या म्हाताऱ्या वयात सुद्धा ती बकऱ्या चारत उन्हातान्हात फिरत आहे म्हणजे ती तिच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत आहे." बिरबल काहीच न बोलता वृद्धेकडे अकबराला घेवून गेला. त्याने वृद्धेला विचारले,"आजी तुम्ही या वयात बकऱ्या का चारत आहात?" वृद्ध महिला म्हणाली,"माझ्या कुटुंबाचे पोट या बकऱ्यांवर चालते." त्यानंतर बिरबलाने तिलाही अकबराच्या मृत्यूची बातमी सांगितली, त्याबरोबर वृद्धा मोठ्यामोठ्याने रडू लागली. हे पाहून दोघेही तिथून पुढे गेले. मग बिरबल अकबराला म्हणाला,हुजूर, तुम्ही लाकुद्तोड्याबद्दल गैर शब्द वापरले त्यानेही तसेच शब्द तुमच्याबद्दल वापरले, याउलट वृद्धेच्या बाबतीत तुम्ही चांगले बोलला तिने तुमच्या खोट्या मृत्यूवर खरे दुःख व्यक्त केले. म्हणजेच आपल्याला हे मान्य करावेच लागेल कि तुमच्या आत्म्याने जे विचार प्रकाशित केले त्याचे प्रत्युत्तर समोरच्या अत्म्याकडून मिळाले, खरय ना !" अकबर हसला.
🌹तात्पर्य ::~
सदभावनेतून सदभावना वाढीस लागते. वाईटातून वाईट घडते, त्यामुळे सर्वांसाठी चांगला विचार करा, चांगलेच प्रत्युत्तर मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०७) 🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
23. "चंदन" पेक्षा "वंदन"
जास्त शीतल आहे .
"योगी" होण्यापेक्षा ;
"उपयोगी" होणे अधिक चांगल..!!
"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा;
"स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे..!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०८) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
23. $ महाराष्ट्रातील नद्यांची माहीती $
┄─┅━━━━▣▣▣━━━━━┅─┄
1) पेंच या नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर ---------- छीदवडा ( मध्यप्रदेश )
2) नर्मदा या नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर ------------ अमरकंटक ( मध्यप्रदेश )
3) वर्धा या नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर ------------- सातपुडा ( मध्यप्रदेश )
4) वैनगंगाया नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर -------- सिवनी ( सातपुडा , मध्यप्रदेश )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०९) 🔹थोरव्यक्ती परिचय🔹
23. $ जागतिक पुस्तक दिन $
=====●●●★●●●=====
२३ एप्रिल हा "जागतिक पुस्तक दिन"
आणि जगप्रसिध्द साहित्यिक
विल्यम शेक्सपिअरचा
°°°°°°°°°°°°°°°°°°
जन्मदिन आणि मृत्यूदिनही..!!
वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध आज जोडला जातो.
पालकांनी टिव्हीला सुंदर पुस्तकांचा पर्याय मुलांना दिला आणि वाचनासाठी शांत जागा आणि वातावरण उपलब्ध करून दिलं तर टिव्हीकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मोठया घरांमध्ये स्वतंत्र खोली देणंही शक्य असतं मात्र ती खोली त्यांच्या आवडत्या पुस्तकांनी भरलेली असायला हवी. असा प्रयोग केलेला आणि सफल झालेला आहे. ज्यांनी केला नाही त्यांनी करून पाहण्यासारखा आहे.
मुलांना ''आता वाचत बसा बरं का रे! उगीच हुदंडू नका!'' असं म्हणून खोलीत कोंडून घातलं तर मुल वाचतील, कारण दुसरा पर्याय नाही आणि पुस्तक हातात आहेत पण वाचनाचा आनंद अशा सक्तीच्या वाचनाने कसा मिळेल? वाचन ही फक्त क्रिया घडेल. त्या कृतीचा आनंद मिळणार नाही. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणं ही मुलगामी गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्वाची भूमिका बजावता येईल. पालकाचाच विचार करायचा झाला तर किती घरात मुलांना वाचनासाठी उदयुक्त केलं जातं? ''अभ्यास कर!'' हा मंत्र सतत मुलांच्या कानावर बिंबवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांना घेऊन देणं हे सामान्यत: घडत नाही. याला काही सुजाण पालकांचे अपवाद असतीलही, पण सामान्यता अभ्यासाचं पुस्तक घेऊन मुलं बसली आहे. आई वडील ते कौतुकाने बघताहेत अशावेळी त्यांच्या तोंडावर समाधान फुललेलं दिसेल.
वाचण या गोष्टीत काही तरी वेगळं आहे, काहीतरी आनंददायी आहे, त्यात रंगून जाणं याला खात्रीचा काहीतरी अर्थ आहे हे त्या बालमनात नकळत रुजण, वाचनाची गोडी निर्माण होण्याची पहिली पायरी इथे सुरू होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*********************************** =====●●●★●●●=====
🔳 दिनांक :- 22/04/2016 🔳
🔘🔘 वार - शुक्रवार 🔘🔘
■★■★■★■★■★■★■★
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०१) 🔶🔹आजचे पंचाग🔹🔶
🍥 22. एप्रिल :: शुक्रवार 🍥
★■★■★■★■★■★■★
चैञ पूर्णिमा
तिथी : पूर्णिमा, नक्षत्र : चित्रा,
योग : वज्र, करण : बव,
सूर्योदय : 06:16, सूर्यास्त : 18:58,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०२) 🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
22. जो गुरू असेल, तो शिष्य असेलच.
जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०३) ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸▪ ====💻💻===
22. रात्र थोडी सोंगे फार--
⭐अर्थ :: ~ काम भरपूर, वेळ कमी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०४) ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
22. गुणै: गौरवमायाति ।
अर्थ : गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०५) ▪🔹 दिनविशेष 🔹
★ 22. एप्रिल :: शुक्रवार ★
=====●●●★●●●=====
* हा या लीप वर्षातील ११३ वा दिवस आहे.
* जागतिक वसुंधरा दिन*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील एका गटाने २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता जगभर हा दिवस ’जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) म्हणुन समारंभ आयोजित करुन साजरा केला जातो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
$ महत्त्वाच्या घटना $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२००६ : प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या.
१९९७ : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर
१९४८ : अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६ : क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट
$जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९२९ : प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक (मृत्यू:
१९२९ : उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल
(मृत्यू: ९ मार्च २००० - नाशिक)
१९०४ : जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
१८७० : व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
१८१२ : लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला.
(मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२०१३ : लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक
(जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
२०१३ : जगदीश वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३)
१९९४ : आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य
१९९४ : रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३)
१९८० : फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)
=========================
22. $ मानव सेवा हिच ईश्वर सेवा $
=====●●●★●●●=====
(Service to man is Service to God)
एक प्रसिद्ध संत होते. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून शिष्यगण येत असत. त्यांच्या शिष्य परिवारातील दोन शिष्य त्यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्नान करून पूजापाठ करण्यात मग्न होते. चार तासांच्या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा-या रूग्णांची सेवा करण्यास ते गुरुला मदत करत. त्या संतमहात्म्याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्यामुळे स्वत: पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना नि:शुल्क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्यांच्या उपचारांची व्यवस्था करत असत. एकेदिवशी त्यांचे दोन्ही शिष्य त्यांच्या दीर्घपूजेत व्यग्र होते. त्याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्यादिवशी आश्रमात रुग्णांची संख्या जास्त होती. परंतु दोन्ही शिष्य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा निरोप धाडला. त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्हा गुरुजींनी त्यांना पुढील शब्दात मार्गदर्शन केले,''वत्सांनो, मी तर व्यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते. कारण ती नि:स्वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्या दोन्ही शिष्यांचे डोळे उघडले.
🌻तात्पर्य. ::~
ईश्वराची जीवंत कलाकृती म्हणजे माणूस त्यांची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पुजा असते.व त्या सेवे पेक्षा अन्य कोणतीही पूजा ही मोठी नाही.
प्रत्येकांने दूसर्यांच्या सुख दू:खात, अडचणीत सामील होणे किंवा मदत करणे आपले कर्तव्य आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०७) 🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
22. मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी..!!
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी..!!
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी..!!
कधी विसरु नये अशी नाती हवी..!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०८) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
22. $ महाराष्ट्रातील नद्यांची माहीती $
┄─┅━━━━▣▣▣━━━━━┅─┄
1) कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -------- उल्हास
2) राज्यातील क्षेत्रानुसार प्रथम क्रमांकाचे
खोरे कोणते ?
उत्तर ----------गोदावरी
3) राज्यातील क्षेत्रानुसार दुसर्या क्रमांकाचे
खोरे कोणते ?
उत्तर ---------- भीमा खोरे
4) राज्यातील क्षेत्रानुसार तिसर्या क्रमांकाचे
खोरे कोणते ?
उत्तर ----------कृष्णा खोरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
22. $ भा.रा. तांबे $
******************
जन्म - २७ अॉक्टोंबर १८७३
मृत्यू - ७ डिसेंबर १९४१
भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुगावली या गावी झाला. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून ‘राजकवी तांबे’ या नावानेही ते ओळखले जातात. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस ‘संतुष्ट कविता’ असे यथार्थतेने संबोधता येईल.
बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.
त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’ ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ‘रुद्रास आवाहन’ ‘रुणझुणू ये’ यांसारख्या कविता स्मरणात राहतील अशाच आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* शुक्रवार * ~ 22/04/2016
***********************************●●=====
🔳 दिनांक :- 21/04/2016 🔳
🔘🔘 वार - गुरूवार 🔘🔘
■★■★■★■★■★■★■★
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०१) 🔶🔹आजचे पंचाग🔹
🍥 21. एप्रिल :: गुरूवार 🍥
★■★■★■★■★■★■★
चैञ शु.१४
तिथी : शुक्ल पक्ष चतुर्दशी, नक्षत्र : चित्रा,
योग : हर्शन, करण : वणीज,
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त : 18:57,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०२) 🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
21. बनू शकलात तर कृतज्ञ बना,
कृतघ्न नको.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०३) ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸▪
21. गर्जेल तो पडेल काय?
⭐अर्थ :: ~पोकळ बडबडणारा काही
करून दखवत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०४) ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
21. विद्या राजसु पूज्यते ।
अर्थ : विद्या राजाच्या ठिकाणी पूजिली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०५) ▪🔹 दिनविशेष
★ 21. एप्रिल :: गुरूवार ★
=====●●●★●●●=====
* राष्ट्रीय नागरी सेना दिन
* हा या वर्षातील ११२ वा दिवस आहे.
$ महत्त्वाच्या घटना $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२००० : आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
१९९७ : भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.
१९७२ : ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले
.
$जन्मदिवस / जयंती / वाढदिवस$
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९३४ : डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
१९५० : शिवाजी साटम – अभिनेते
१९२६ : एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो.
१८६४ : मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ
(मृत्यू: १४ जून १९२०)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२०१३ : शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
(जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
१९५२ : सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (जन्म: २४ एप्रिल १८८९)
१९४६ : जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३)
१९३८ : सर मुहम्मद इक्बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते
(जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)
=====================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०६) ▫▪ बोधकथा ▪
21. 🌷लोभाची शिक्षा🌷
=====●●●★●●●=====
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस.
🌹 तात्पर्य ::~ लोभ माणसाच्या जीवावर बेतू शकतो.लोबभ मानसाचे नूकसान करतो.अति लोभ टाळणे आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०७) 🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
21. ...अंधारासारख्या संकटाला...
...दोष देत बसण्याऐवजी...
...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...
...तरच अंधार दूर होईल...
...आपल्या नशीबापेक्षा...
...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...
...कारण उद्या येणारी वेळ...
...आपल्या नशीबामुळे नाही...
...तर कर्तृत्वामुळे येते...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०८) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
21. $ महाराष्ट्रातील नद्यांची माहीती $
┄─┅━━━━▣▣▣━━━━━┅─┄
1)गोदावरीया नदीचे उगमस्थान कोठेआहे ?
उत्तर ----------त्र्यंबकेश्वर ( नाशिक )
2) भीमा या नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर ---------- भीमाशंकर ( पुणे )
3)कृष्णा या नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर -------- महाबळेश्वर ( सातारा )
4)तापीया नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर --------- बैतुल ( सातपुडा , मध्यप्रदेश )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०९) 🔹थोरव्यक्ती परिचय🔹
21. देबुजी झिंगराजी जानोरकर उर्फ
🌀🌹 संत गाडगेबाबा🌹🌀
=====●●●★●●●=====
जन्म ::~ 23 फेब्रुवारी 1876
जि. अमरावती
समाज सुधारक, राष्ट्रसंत,
मानवतावादी, अंधश्रध्दा निर्मुलन
चळवळी चे पहीले संस्थापक होते.
💐🌹💐🌹💐🌹💐🌹
देव देवळात नाही
तो माणसात आहे ..!!!
म्हणून
माणसाला माणुस म्हणून
ओळखायला शिका ..!!!
मुलांना शिक्षण द्या ..!!!
प्राण्यांचा बळी देवु नका ..!!!
अंधश्रद्धा पाळू नका ..!!!
स्वच्छता पाळा ..!!!
कर्ज काढून मुलांचे लग्न करू नका ..!!!
असा संदेश देणारे ...!!!
पुरोगामी संत मा.संत गाडगेबाबा
यांच्या महान जनसेवेच्या कार्या निमित्त
त्यांना विनम्र अभिवाद
***********************************
आजचा परिपाठ
🔳 दिनांक :- 20/04/2016 🔳
🔘🔘 वार - बुधवार 🔘🔘
■★■★■★■★■★■★■★
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०१) 🔶🔹आजचे पंचाग🔹🔶
🍥 20. एप्रिल :: बुधवार
★■★■★■★■★■★■★
चैञ शु.१४
तिथी : शुक्ल पक्ष त्रयोदशी, नक्षत्र : हस्त,
योग : व्यघात, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त : 18:57,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०२) 🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
20. खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०३) ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸
20. उंटावरून शेळ्या हाकणे--
⭐अर्थ :: ~आळस, हलगर्जीपणा करणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०४) ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
20. दाता क्षमी गुणग्राही
स्वामी दुःखेन लभ्यते |
शुचिर्दक्षोऽनुरक्तश्च जाने भ्रृत्योऽपि दुर्लभः ||
$ अर्थ :-- उदार, क्षमशील, गुणांची कदर करणारा मालक मिळणे कठीण आहे आणि पवित्र शुद्ध आचरण असणारा दक्ष आणि धन्यावर प्रेम करणारा नोकरसुद्धा दुर्मिळ असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०५) ▪🔹 दिनविशेष
★ 20. एप्रिल :: बुधवार ★
=====●●●★●●●=====
* हा या लीप वर्षातील १११ वा दिवस आहे
$ महत्त्वाच्या घटना $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२०१३ : राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले:
पद्मभूषण – कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खाँ, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी व अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर)
पद्मश्री – नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त & विजयकुमार
१९४६ : राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली. पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये(United Nations) रुपांतर झाले.
१७७० : प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
$ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९५० : चंद्राबाबू नायडू – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
१९३९ : सईदुद्दीन डागर – ध्रुपद गायक
१९१४ : गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक
(मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)
१८९६ : ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (मृत्यू: ९ जुलै १९६८)
१८८९ : अॅडॉल्फ हिटलर – बव्हेरियाच्या सरहद्दीवरील ब्रानाउ आम इन या गावी सकाळी साडे सहा वाजता नाझी हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. तो आपल्या बापाच्या तिसऱ्या लग्नसंबंधापासून झालेला तिसरा मुलगा होता
(मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९९९ : कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
(जन्म: १६ सप्टेंबर १९१३)
१९६० : अमल ज्योती तथा ’पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार
(जन्म: २४ जुलै १९११)
१९३८ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (जन्म: १८ आक्टोबर १८६१)
१९१८ : कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ६ जून १८५०)
===================
20. 🌻🌻 अहंकार 🌻🌻
------------------------------
उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला.
🌹तात्पर्य 🌹
👉अहंकार आणि अहंकार्याचे पतन निश्चितच होते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास सार्थक होत असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०७) 🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
20. ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची तयारी असते; तीच माणसे खऱ्या अर्थाने नेतृत्व करु करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०८) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
20. $ भारताचे मानचिन्हे $
┄─┅━━━━▣▣▣━━━━━┅─┄
* राष्ट्रीय नदी : ~ गंगा
* राष्ट्रीय महाकाव्य : ~ गीता
* राष्ट्रीय जलजीव : ~ गंगा डॉल्फिन
* राष्ट्रीय फळ : ~ आंबा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०९) 🔹थोरव्यक्ती परिचय🔹
20. ##$ पं. नेहरू $##
=====●●●★●●●=====
⭐भारताचे पहिले पंतप्रधान
☀पंडित जवाहरलाल नेहरू
⭐जन्म : १४ नोवेंबर १८८९ (अलाहाबाद)
⭐मूत्यू : २७ मे १९६४
महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुले ते १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. १७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.
देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ” पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखळला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍥 18. एप्रिल :: सोमवार 🍥
★■★■★■★■★■★■★
चैञ शु.१२
तिथी : शुकल पक्ष द्वादशी,
नक्षत्र : पूर्वफाल्गुनी,
योग : व्रुद्धी, करण : बव,
सूर्योदय : 06:19, सूर्यास्त : 18:57,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०२) 🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
18. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०३) ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸▪ ====💻=====💻===
18. घोडामैदानजवळ असणे
⭐अर्थ :: ~ परीक्षा लवकरच होणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०४) ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
18. मृदोः परिभवो नित्यं वैरं
तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां
वृत्तिं समाश्रयेत् ||
$ अर्थ :- फार मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर सगळ्यांशी भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून माणसाने मध्यममार्ग स्वीकारावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०५) ▪🔹 दिनविशेष 🔹▪
=========================
★18. एप्रिल :: सोमवार ★
=====●●●★●●●=====
* हा या लीप वर्षातील १०८ वा दिवस आहे.
* जागतिक वारसा दिन *
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
$™महत्त्वाच्या घटना $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९५० : आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
१९३६ : पेशव्यांची राजधानी असणार्या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
१९३० : क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.
१८९८ : जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी
१८५३ : मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
$ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९५८ : माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)
१९५६ : पूनम धिल्लन – अभिनेत्री
१९१६ : ललिता पवार – अभिनेत्री
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८)
१८५८ : महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्न (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ - मुरुड)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२००२ : शरद दिघे – महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष
२००२ : थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (जन्म: ६ आक्टॊबर १९१४)
१९९९ : रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार
(जन्म: २२ आक्टोबर १९४२ - जयपूर)
१९९५ : पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक
१९७२ : डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्न
(जन्म: ७ मे १८८०)
१९५५ : अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ मार्च १८७९)
१८९८ : दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे]
(जन्म: २४ जून १८६९)
१८५९ : १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले.
==========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०६) ▫▪ बोधकथा ▪▫
====💻======💻===
18. ♦♦ जिद्द् ♦♦
===============
ही फार प्राचीन काळची गोष्ट आहे. गुरूजी शिष्याना आपल्या आश्रमात शिक्षण देत असत.
शिष्याना गुरुजींची सेवा करावी लागत असे. शिष्याच काही चुकलं,तर गुरूजी त्यांना शिक्षा सुद्धा करीत असत.
असेच एकदा शिष्यानी योग्य पाठांतर केले नाही म्हणून गुरूजी त्यांना छड्या मारीत होते. मुकाट्याने छड्या खाऊन एकेक शिष्य खाली बसत होता. आणखी एक शिष्याचा हात वर आला. गुरूजी चमकले, ते म्हणाले "अरे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. तुला मारून तरी काय उपयोग?"
त्यांनी त्याला छड़ी मारली नाही. शिष्याला तो मोठा अपमान वाटला.
त्याने मनोमन निश्चय केला "मी माझ्या हातावर विद्येची रेषा खेचून आणिन." त्याने अनंत कष्ट घेतले. विद्या संपादन केली. एवढेच नव्हे, तर तो एक महान व्याकरणकार झाला. तो म्हणजेच संस्कृतचा महान व्याकरणकार "पाणिनी".
$ तात्पर्य:~ आपले भविष्य हाताच्या रेषांवर नाही,तर आपल्या कर्तुत्वावर ठरते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०७) 🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
18. "एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला,
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.
आयुष्याचे calculation खूप वेळा केले,
पण 'सुख दुःखाचे' accounts
कधी जमलेच नाही.
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..
की 'आठवण' सोडून काहीच
balance उरत नाही".
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०८) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
18. १) जालियॉवाला बाग हत्याकांड
करिता कोणता जनरल उत्तरदायी होता?
२) राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांची नियुक्ति कोण करतो?
३) "प्रोजेक्ट एरो" चा संबंध कोणत्या आधुनिकीकरणाशी आहे?
=======================
$ उत्तरे $
१) जनरल डायर
२) राज्यपाल
३) टपालघर/पोस्टअॉफिस
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
०९) 🔹थोरव्यक्ती परिचय🔹 ====💻======💻===
18. $ धोंडो केशव कर्वे $
┄─┅━━━━▣▣▣━━━━━┅─┄
🙏💐 यांची आज जयंती 💐🙏
त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!! ....................................................
दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती ....
🙏🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏🙏
टोपणनाव: ~ अण्णा
जन्म:~ १८ एप्रिल १८५८ मुरूड
मृत्यू: ~ ०९ नोव्हेंबर १९६२
चळवळ:~ स्त्री शिक्षण आणि सामाजिक
सुधारणा
पुरस्कार: ~ भारतरत्न
•धोंडो केशव कर्वे •
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली.
त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९०८ मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विदकर्वे
ठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.
No comments:
Post a Comment